राजर्षी शाह महाराज (१८७४-१९२२)

  • राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कोल्हापुर जिल्हयातील कागल या गावी घाटगे घराण्यात कागल येथील "लक्ष्मी विलास पॅलेस" मध्ये झाला. शाहु महाराज यांचे मुळ नाव यशवंत (यशवंत जससिंगराव घाटगे) होते. शाहु महाराज यांच्या वडीलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब होते. तर त्यांच्या आईचे नाव "राधाबाई" असे होते. शाहु महाराज हे ०३ वर्षांचे असताना त्यांच्या जन्मदात्या आईचा मृत्यु झाला. 
  • २६ जुन हा शाहु महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासुन "सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे. 
  • १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापुर संस्थानच्या तत्कालीन महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहु महाराज यांना दत्तक घेतले. त्यावेळी ब्रिटीश सरकार तर्फे मुंबईचा गव्हर्नर जेम्स फग्र्युसन व कर्नल एच.ए.रिव्हज यांनी शाहु महाराजांच्या दत्तक विधानास मान्यता दिली. 
  • शाहु महारांचे सुरवातीचे शिक्षक म्हणुन श्री कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले यांना नेमले होते. 
  • २० मार्च १८८६ रोजी शाहु महाराज यांचे वडील जयसिंगराव यांचा मृत्यु झाला. 
  • १८८५ ते १८८९ या काळात शाहुमहारांजी राजपुत्रांच्या "राजकोट" महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांना या महाविद्यालयाचे प्रिन्सीपॉल मॅकनॉटन यांनी विशेष मार्गदर्शन केले. याच काळामध्ये दत्ताजी शिंदे व पांडुरंग भोसले यांच्या कडुन मल्लविद्येचे शिक्षण शाहु महाराजांनी घेतले. 
  • ०८ मे १८८८ रोजी "कोल्हापूर ते मिरज" या रेल्वे मार्गाची पायाभरणी ही शाहु महाराजांच्या हस्ते करण्यात आली. 
  • १८९० ते १८९४ या काळात शाहु महाराजांनी "धारवाड येथील "एस.एम.फ्रेजर" यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास व राज्य कारभाराचे धडे शाहु महाराजांना एस.एम.फ्रेजर यांनी दिले. 
  • ०१ एप्रील १८९१ रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्या "लक्ष्मीबाई" यांच्याशी शाहु महारांजाचा विवाह झाला. 
  • शाहु महाराजांना राधाबाई व आऊबाई अशा दोन मुली तर राजाराम व शिवाजी अशी दोन मुले अशी एकुण ०४ आपत्ये होती. यातील राजकुमार शिवाजी यांचा १९२० साली रानडुकराच्या शिकारीच्या वेळी घोड्याहुन पडुन मृत्यु झाला होता. १८९३ मध्ये कोल्हापूर संस्थानने स्वतःचे कायदे पुस्तक तयार केले. 
  • ०२ एप्रील १८९४ रोजी शाहु महाराजांचा "राज्याभिषेक" होवुन वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची सुत्रे शाहु महाराजांनी स्विकारली व शाहु महाराजांच्या राजकीय कार्यकाळास सुरुवात झाली. शाहु महाराजांच्या राज्याभिषेक साहेळ्या दरम्यान ब्रिटीश सरकार तर्फे मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड हॅरिसन हा उपस्थित होता. 
  • १८९५ मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापूर येथे "शाहुपूरी" ही गुळाची बाजारपेठ सुरु केली. 
  • १८९६ साली सर्व जाती जमातींच्या विद्यार्थासाठी शाहु महाराजांनी "राजाराम" हे वस्तीगृह सुरु केले व याच सालापासुन शाहु महाराजांच्या वस्तीगृह निर्मीतीच्या कार्याला सुरुवात झाली. 
  • १८९७ साली महारोग्यांसाठी "व्हिक्टोरीया लेप्रसी' या हॉस्पीटलची स्थापना शाहु महाराजांनी केली. 
  • नोव्हेंबर १८९९ मध्ये शाहु महाराजांच्या जिवनास कलाटणी देणारे "वेदोक्त प्रकरण" घडले. शाहु महाराज पंचगंगा नदी काठी स्थानासाठी गेले असतान त्यांचे पुरोहीत नारायण भटजी हे वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे महाराजांचे सहकारी राजाराम शास्त्री भागवत यांनी महाराजांना लक्षात आणुन दिले. या बाबत महाराजांनी विचारणा केली असता महाराज हे क्षेत्रीय नसल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे सांगतीले. येतुन ख-या अर्थाने ब्राम्हणेत्तर संघर्ष चळवळीस सुरुवात झाली. 
  • १९०१ मध्ये शाहु महाराजंनी आप्पासाहेब राजोपाध्याय यांचे वतने जप्त केली. व नारायण भट्ट सेवकरी | यांच्या कडुन वेदोक्त पद्धतीने श्रवणी केली. 
  • वेदोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक व शृंगरीचे जगतगुरु शंकराचार्य यांनी ब्राम्हणांची बाजू घेतली व शाहु महाराजांवर टिका केली. 
  • १६ एप्रील १९०२ रोजी वेदोक्त प्रकरणासंदर्भात ब्रिटीश शासनाने नेमलेल्या वेदोक्त समितीने शाहु महाराजांच्या बाजुने निकाल देवुन शाहुंना वेदोक्त मंत्राचा अधिकार असल्याचा निकाल दिला. 
  • राजर्षी शाहु महाराज हे "डेक्कन एज्युकेशन सोसायटी" चे पदसिद्ध अध्यक्ष होते. वेदोक्त प्रकरणानंतर शाहु महाराजांनी या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. 
  • १९०१ मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापुर संस्थानामध्ये "गोहत्या प्रतीबंधक कायदा" लागु केला. 
  • १९०१ साली शाहु महाराजांनी "व्हिक्टोरीया मराठा बोर्डीग" ची स्थापना केली. परंतु या बोर्डीगमध्ये फक्त ब्राम्हण मुलेच राहु लागल्याने शाहुंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वस्तीगृहे सुरु केली. 
  • १८ एप्रील १९०१ रोजी जैन, लिंगायत व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र्य वस्तीगृहे शाहु महाराजांनी स्थापन केली. 
  • ०२ जुन १९०२ रोजी शाहु महाराज हे इंग्लंडच्या ०७ व्या एडवर्ड च्या राज्यरोहन समारंभासाठी इंग्लंडला गेले होते. या कार्यक्रमाचे वेळी केंब्रीज विद्यापीठाने शाहु महाराजांना LLD ही पदवी बहाल केली.
  • महत्वाचे :- २६ जुलै १९०२ रोजी शाहु महाराजांनी कोल्हापुर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी ५० टक्के जागा राखीव / आरक्षीत ठेवल्या. आरक्षण बाबतचा हा जाहीरनामा "करवीर गॅजेट" मधुन प्रकाशित करण्यात आला होता. 
  • १९०२ साली शाहु महाराजांनी "पाटबंधारे धोरण" घोषीत केले. 
  • १९०५ साली शाहु महाराजांनी राजोपाध्याय यांची इनामे जप्त केली व छात्र जगतगुरुचे नवे पीठ निर्माण करुन मराठा जातीच्या "सदाशिव बेनाड़ीकर" यांची पीठाचे प्रमुख म्हणून नेमणुक करण्यात आली. तसेच संस्थान मध्ये निरनिराळ्या जातींचे पुरोहीत निर्माण करण्याकरीता "पुरोहीत शाळा" निर्माण केल्या. 
  • १९०६ मध्ये शाहु महाराजांनी "छत्रपती शाहु स्पिनींग व जिनींग मिल" स्थापन केली. (२००३ मध्ये महाराष्ट्र शासनाने ही मिल बंद केली आहे)
  • १९०६ साली शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानात "रात्रशाळा सुरु केल्या. तर १९०७ साली शाहु महाराजांनी मुलींसाठी रात्रशाळा सुरु केल्या. 
  • १९०७ साली कोल्हापुरच्या पश्चिमेस ५५ किमी अंतरावर दाजीपुर जवळ भोगावती नदीवर धरण बांधुन त्याच्या जलाशयास "महाराणी लक्ष्मीबाई" हे नाव देण्यात आले. या धरणाचे काम सबनीस या इंजिनीअर कडुन करुन घेण्यात आले. याच धरणाशेजारी शाहु महाराजांच्या मुलीच्या नावावर "राधानगरी" हे गाव वसविण्यात आले. 
  • १९०८ साली शाहु महाराजांनी अस्पृश्यांसाठी "मिस क्लार्क" हे वस्तीगृह स्थापन केले. 
  • २० मे १९११ रोजी शाहु महाराजांनी संस्थानामार्फत जाहीरनामा प्रसिद्ध करुन संस्थानातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १५ टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली. 
  • १९११ साली शाहु महाराजांनी शिंपी समाजाच्या मुलांसाठी "नामदेव वस्तीगृह" सुरु केले.
  • महत्वाचे :- ११ जानेवारी १९११ रोजी शाहु महाराजांनी कोल्हापूर येथे "सत्यशोधक समाज" या संस्थेच्या शाखेची स्थापना केली व त्यांचे अनुयायी भास्करराव जाधव यांची अध्यक्ष म्हणून नेमणुक केली. भास्कर जाधव यांचे पुस्तक " घरचा पुरोहीत" हे आहे. 
  • १९११ च्या हुकूमनाम्यानुसार अस्पृश्यांना मोफत शिक्षण देण्यास सुरुवात केली. 
  • १९१२ साली शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये "सहकारी कायदा" पारीत केला. 
  • १९१२-१३ साली शाहु महाराजांनी संस्थान मधील शेतक-यांना शेती विषयक शिक्षण देण्याकरीता "किंग एडवर्ड अॅग्रीकल्चर इन्स्टिट्युट" या संस्थेची स्थापना केली. 
  • १९१२ मध्ये महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये पाटील शाळा सुरु केल्या 
  • १९१३ मध्ये कोल्हापूर संस्थानमध्ये सत्यशोधक समाजाच्या शाळा सुरु करुन त्याच्या प्रमुखपदी विठ्ठलराव ढोणे यांची नेमणुक शाहु महाराजांनी केली. 
  • १९१६ साली शाहु महाराजांनी बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, बहुजनांना राजकीय हक्क मिळवुन देणे या कार्यासाठी निपाणी येथे "डेक्कन रयत शिक्षण संस्था" ची स्थापना केली. (रयत शिक्षण संस्था १९१९ - कर्मवीर भाऊराव पाटील) 
  • १९१७ साली विधवा पुर्नविवाहास मान्यता देणारा कायदा शाहु महाराजांनी पारीत केला. 
  • २५ जुलै १९१७ रोजी प्राथमिक शाळेमध्ये फी माफीची घोषणा शाहू महाराजांनी केली. 
  • २१ नोव्हेंबर १९१७ रोजी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. यासंबंधाने पहीलीशाळा "चिपरीपेटा" येथे शाहु महाराजांनी सुरु केली. (१८९३ मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थानिक - सयाजीराव गायकवाड) 
  • १९१७ साली जातवार प्रतीनिधीत्वासाठी शाहु महाराजांनी भारत मंत्री लार्ड मॉन्टेग्यु यांची भेट घेतली. 
  • महत्वाचे :- शाहु महाराजांनी १९१९ च्या माँटेग्यु-चेम्सफर्ड या कायद्याचे स्वागत केले होते. 
  • ०४ मार्च १९१८ रोजी करवीर तालुक्यातील चिखली या गावी सक्तीचे व मोफत शिक्षण देणारी शाळा शाहु महाराजांनी सुरु केली. 
  • १९१८ साली शाहु महाराजांनी महार वतने, बलुतेदारी व वेठबिगारी प्रथा बंद केली. तसेच आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. 
  • १९१८ मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थान मध्ये "तलाठी शाळा सुरु केल्या. 
  • १९१८ साली शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये "आर्य समाज" या संस्थेच्या शाखेची स्थापना करुन राजाराम महाविद्यालय हे आर्य समाजाकडे हस्तांतरीत केले. 
  • १९१९ साली शाहु महाराजांनी स्त्रीयांना क्रुरपणे वागणुक देण्याच्या प्रथेवर प्रतीबंधक कायदा मंजुर केला.  
  • १९२० मध्ये शाहु महाराजांनी संस्थानामध्ये "घटस्फोटाचा कायदा संमत केला. 
  • १९२० मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापूर येथे "लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कुल" ची स्थापना केली. 
  • १९२० मध्ये शाहु महाराजांनी गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणुन कोल्हापूर येथे "प्रिन्स शिवाजी | मराठा बोर्डिंग हाऊस" ची स्थापना केली. 
  • शाहु महाराजांनी महार पैलवानांना जाट पैलवान, चांभारांना सरदार व भंग्यांना पंडीत अशा पदव्या दिल्या होत्या. शाहु महाराजांनी कोल्हापूर नगर पालिकेच्या चेरमनपदी "दत्तोबा पवार" यास अस्पृश्याची नेमणुक केली होती. 
  • ०६ मे १९२२ रोजी वयाच्या ४८ व्या वर्षी मुंबई येथील खेतवाडी मधील "पन्हाळा लॉज" या बंगल्यावर शाहु महाराजांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. 
  • शाहु महाराजांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथील रेल्वे स्थानकास "छत्रपती शाहु टर्मिनस" हे नाव देण्यात आहे. 
  • राजर्षी शाहू महाराजांची इतर महत्वाची कार्ये व माहीती :-
  • छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराबाई यांना आपले दैवत मानत. 
  • डॉ आंबेडकर यांच्या "मुकनायक" व आगरकर यांच्या "सुधारक" या वृतपत्रांना शाहु महाराजांनी आर्थीक सहकार्य केले होते. 
  • शाहु महाराजांनी पं. म. मोहन मालविय यांच्या विनंतीवरुन "बनारस हिंदु विश्व विद्यालयास" आर्थिक सहकार्य केले. 
  • "थिऑसॉफिकल सोसायटी" या धार्मीक संघटनेचा शाहु महाराजांवर विशेष प्रभाव होतो. 
  • शाहु महाराजांनी कोल्हापर येथे देशातील पहीले "रेसकोर्स" स्थापन केले. 
  • शाहु महाराजांनी गंगाधर कांबळे या अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीस चहाचे हॉटेल टाकुन दिले व त्या हॉटेलला "सत्यशोधक हॉटेल" असे नाव दिले. 
  • ब्रिटीशांच्या विरोधात शिवाजी क्लब ही क्रांतीकारी संघटना कोल्हापूर येथे स्थापन करण्यातआली होती. शाहु महाराज हे दरवर्षी या संघटनेस ५०० रु मदत देत असत. तसेच क्रांतीकारकांनी काढलेल्या "वनिता वस्त्रभंडार" येथुन शाहु महाराज हे दरवर्षी संस्थानाचे कपडे खरेदी करत असत. 
  • संस्थानच्या एकुण महसुला पैकी ०६ टक्के महसुल शाहु महाराज हे शिक्षणावर खर्च करीत असत. 
  • पहील्या महायुद्धाचे वेळी शाहु महाराजांनी ब्रिटीशांना २० लाख रु कर्ज दिले होते व वैयक्तीक देणगीतुन २० हजार रुपये दिले होते. युद्ध कामासाठी महाराज संस्थानातुन महीन्याला २०० सैनिक पुरवित असत. 
  • चिरोल या ब्रिटीश लेखकाच्या "इंडियन अनरेस्ट' या ग्रंथाचे मराठीमध्ये अनुवाद रा. र. डोंगरे यांचे कडुन करुन घेवुन त्या ग्रंथाच्या प्रती विकत घेवुन संस्थानमध्ये मोफत वाटल्या. 
  • महाराजांनी जेष्ठ गायीका केसरबाई केरकर, बालगंधर्व, संगीतसम्राट आल्लामियाँ खान यांना राज आश्रय दिला. तसेच महाराजांनी आप्पाजी धोंडीराज मुरतुलेय या कवीसही राज आश्रय दिला. 
  • शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या शिक्षणाधिकारी पदी मिस लिट्स नंरत श्रीमंत रखमाबाई केळकर यांची नेमणुक केली. 
  • शाहु महाराजांनी कुस्त्यांकरीता कोल्हापूर येथे "खासबाग मैदान" तयार केले. 
  • १८९३ मध्ये शाहु महाराजंनी "देवल क्लब" ची स्थापना केली. 
  • १८९५ मध्ये शाहु महाराजांनी "मोतीबाग तालीम" ची स्थापना केली. 
  • रोमन कॅथॉलिक पंथाचा ए लॉरेंन्स हा शाहु महाराजांचा अंगरक्षक होता. 
  • १९१२ मध्ये पैलवानांना कुस्ती जिंकल्यानंतर गदा देण्याच्या प्रथेची सुरुवात शाहु महाराजांनी केली. इमाम बक्श या पहीलवानास शाहु महाराजांनी पहीली गदा दिली. 
  • १९१३ मध्ये धो. रा. सुतार याच्या कडुन शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा तयार करुन घेवुन शाहु महाराजांनी पन्हाळा गडावर स्थापन केला. 
  • १९०५ मध्ये १५ लाख रुपयांची भांडवीली गुंतवणुक करुन शाहु महाराजंनी सुत गिरणी स्थापन केली. 
  • १८९५ मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थान मधील शेणगाव येथे काताचा कारखाना सुरु केल. 
  • १९१३ मध्ये शाहु महाराजंनी नागरी पतपेढ्यांची स्थापना केली. 
  • १८९१ मध्ये शाहु महाराजांनी संस्थानाचे "भु-गर्भशास्त्र सर्वेक्षण केले. 
  • 0 १८९५ मध्ये शाहु महाराजांनी संस्थानाचे "औद्योगीक सर्वेक्षण" केले. 
  • १९०६ ते १९०७ मध्ये शाहु महाराजांनी संस्थानाचे "जल सर्वेक्षण केले. 
  • शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये तांत्रीक शिक्षणाकरीता जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्युट या संस्थेची स्थापना केली.
  • शाहु महाराजांनी मुलांमध्ये लष्करी जीवनाची आवड निर्माण व्हावी म्हणुन कोल्हापूर येथे "इन्फंट्री स्कुल" ची स्थापना केली. 
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंड मधील शिक्षण घेण्याकरीता शाहु महाराजांनी शिष्यवृत्ती देवुन आर्थिक सहाय्य केले होते. (महत्वाचे :- डॉ आंबेडकर यांना अमेरीकेतील कोलंबिया येथील शिक्षणा करीता सयाजीराव गायकवाड यांनी आर्थिक मदत केली होती)
  • शाहु महाराजानी भुषविलेली अध्यक्षपदे :- 
  • १० नोव्हेंबर १९१८ रोजी परळ (मुंबई) येथे झालेल्या कामगारांच्या सभेचे अध्यक्षस्थान शाहु महाराजांनी भुषविले. 
  • १९१८ साली शाहु महाराजांनी नवसारी (गुजरात) येथे भरलेल्या "आर्य समाज" च्या ११ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद भुषविले. 
  • १९ एप्रील १९१९ रोजी शाहु महाराजांनी कानपुर येथे भरलेल्या कुर्मी क्षत्रीय परीषदेच्या १३ व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भुषविले. २१ एप्रील रोजी याच कार्यक्रम दरम्यान शाहु महाराजांना राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली. 
  • १९२० मध्ये शाहु महाराजांनी गुजरात मधील भावनगर येथील आर्य समाजाच्या परीषदेचे अध्यक्षपद भुषविले. 
  • १९२० मध्ये शाहु महाराजांनी नागपूर व दिल्ली येथील अखिल भारतीय बहीष्कृत परीषदेचे अध्यक्षपद भुषविले. 
  • २० मार्च १९२० रोजी शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील माणगांव येथील दलीतांच्या परीषदेसत उपस्थित राहुन डॉ आंबेडकर यांनी दलीत समाजाचे नेतृत्व करावे असे प्रोत्साहन दिले. 
  • १९२० साली कर्नाटक मधील हुबळी येथे ब्राम्हणेत्तर परीषद भरविण्यात आली होती या परीषदेचे शाहू महाराज अध्यक्ष होते. शाहु महाराजांनी मिळालेले सन्मान व पदव्या :- 
  • ब्रिटन राणी व्हिक्टोरीयाच्या वतीने शाहु महाराजांना GCSI हा इंग्रज शासनाचा बहुमान लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या हस्ते देण्यात आला. 
  • १४ मे १९०० रोजी व्हिक्टोरीया राणीच्या वाढदिवसानिमीत्ताने ब्रिटीश सरकारने शाहु महाराजांना "महाराजा" ही पदवी दिली. 
  • १६ एप्रील १९२० रोजी शाहु महाराजांना नाशिकच्या जनतेकडुन मानपत्रे अर्पण करण्यात आली. 
  • "शाहु महाराज म्हणजे सर्वांगपुर्ण राष्ट्रपुरुष" असा गैरव महर्षी वि रा शिंदे यांनी केला. 
  • "He was king, But democratic king" असे शाहु महाराजांचे वर्णन भाई माधवराव बागल यांनी केले. 
  • "महाराष्ट्राचा गौतमबुद्ध" असे वर्णन यशवंतराव मोहीले यांनी केले. 
  • उत्तरप्रदेश मधील कानपुर विद्यापीठास शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आहे. 
  • "He was a pioneer of Social Democracy" असे शाहु महाराजांबद्दल उद्गार डॉ. आंबेडकर यांनी काढले.