महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०९)

  • न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवरी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्यातील "निफाड" या गावी झाला. रानडे यांच्या वडीलांचे नाव गोविंद व आईचे नाव गोपीकाबाई होते. न्या. रानडे यांनी प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे पुर्ण केले. 
  • १८५६ मध्ये पुढील शिक्षणसाठी ते मुंबईतील एल्फिस्टन कॉलेज मध्ये गेले. 
  • १८६२ मध्ये इतिहास व अर्थशास्त्र या विषयामध्ये ते बी ए उत्तीर्ण झाले. याच वर्षी "इंदुप्रकाश" या वृत्तमान पत्राचे संपादकपद न्या. रानडे यांच्याकडे आले. 
  • १८६५ मध्ये न्या. महादेव गोविंद रानडे यांनी "विधवा विवाह उत्तेजक मंडळी" नावाची संस्था स्थापन केली. (१८९३ रोजी महर्षी कर्वे यांनी पुणे येथे "विधवा उत्तेजक मंडळी" या नावाने संस्था स्थापन केली)
  • १८६६ साली मुंबई विद्यापीठाचे "पहिले भारतीय फेलो" म्हणुन ब्रिटीश शासनाने न्या. रानडे यांची नेमणुक केली होती. याच वर्षी न्या. रानडे यांनी LLB करीता प्रवेश घेतला. 
  • १८६८ मध्ये एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये ते इतिहास व इंग्रजी विषय शिकवु लागले. 
  • १८७१ मध्ये पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना करण्यामध्ये न्या. रानडे यांनी महत्वपर्ण भुमिका बजावली होती. 
  • ३१ मार्च १८७६ रोजी न्या. रानडे, आत्माराम पांडुरंग, डॉ. रा. गो. भंडारकर इ. मंडळींनी मिळून मुंबई येथे "प्रार्थना समाज" या संस्थेची स्थापना केली. तसेच "भारतीय सामाजिक परीषद" या महत्वपुर्ण संस्थेची स्थापना न्या. रानडे यांनी केली होती. 
  • महत्वाचे :- ११ मे १८७८ रोजी पुणे मधील हिराबाग येथे न्या. रानडे यांच्या पुढाकाराने देशातील पहीले साहित्य संमेलन भरविण्यात आले. या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद न्या. महादेव गोविंद रानडे यांनीच भुषविले. १८८५ मध्ये ०२ रे साहित्य संमेलन पुणे येथेच भरविण्यात आले होते व मे १९०५ मध्ये ०३ रे साहित्य संमेलन सातारा येथे भरविण्यात आले. या ०३ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद र. गो. करंदिकर यांनी भुषविले होते. 
  • १८८५ मध्ये ब्रिटीश शासनाने न्या. रानडे यांना मुंबई कायदे काऊन्सीलवर कायद्याचे सल्लागार म्हणुन नियुक्त केले. १८८५ मध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये ही त्यांनी महत्वपुर्ण भुमिका बजावली होती. 
  • १८८५ मध्ये त्यांनी सामाजिक परीषदेचे अध्यक्षपद भुषविले व १८९० मध्ये त्यांनी औद्योगिक परीषदेचे अध्यक्षपद भुषविले. त्यांना "हिंदी अर्थशास्त्रचा जनक" असे ओळखले जाते. 
  • भारताच्या स्वातंत्र पुर्व काळातील मवाळवादी विचारसरणीचे प्रमुख नेते म्हणुन न्या. रानडे यांना ओळखले जाते. 
  • देशामध्ये विवीध न्यायालायांमध्ये न्या. रानडे यांनी न्यायाधिश म्हणून काम केले होते. 
  • १८९३ मध्ये ब्रिटीश शासनाने न्या. रानडे यांची मुंबई उच्च न्यायालायाचे उच्च न्यायाधिश म्हणून नेमणुक केली होती. 
  • न्या. रानडे यांनी त्यांच्या जिवन काळात वृत्कृत्तोजक सभेची स्थापना केली. 
  • तसेच त्यांनी पुणे येथे "नेटिव्ह जनरल लॅयब्ररी" ची स्थापना केली. न्या. रानडे यांनी पुणे येथे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. 
  • न्या. रानडे यांनी "द राईज ऑफ मराठा पॉवर" (मराठी सत्तेचा उदय) हा महत्वपुर्ण ग्रंथ लिहीला. तसेच त्यांनी "अॅस्से इन इंडियन इकॉनॉमिक्स बाय एम जी रानडे" हा अर्थशास्त्र विषय ग्रंथही लिहीला होता.